टाकतो देऊन सारे मूर्त जे माझ्याकडे.. सूर्यही सोडून किरणे चालला क्षितिजाकडे..
कालच्या साऱ्या क्षणांची मागतो आता क्षमा.. पळभरी गुंतूनी इतिहासात केले ज्या जमा..
पावलांनी पार केली अंतरेच्या अंतरे.. माणसांची कैकदा केली खरी भाषांतरे..
आर्जवांचे पर्व दूरी सारतो आहे.. प्राक्तनाचा हात धरुनी चालतो आहे..
मोकळे उतरुनी ओझे व्हायचे आहे.. मज उद्या सोडून सारे जायचे आहे..
-ऋचा

No comments:
Post a Comment